Class 10th|Political parties

मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणिनिवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वांत महत्त्वाचा दुवा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीयपक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्षपद्धतीची ओळख करून घेणार आहोत.तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्यातरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिल्या असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. विविध चळवळींच्या आंदोलनाविषयीही तुम्हीवाचता. याचा अर्थ असा की समाजात ज्याप्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याचप्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल, की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्रयेऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्यासंघटनांना ‘राजकीय पक्ष’ म्हटले जाते. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय.राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील.सत्ता मिळवणे : राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धाकरण्यात अयोग्य काहीच नाही. परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे.विचारसरणीचा आधार : प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नांबाबत पक्षांची एक विशिष्ट भूमिका असते. या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो, त्याला त्या ‘पक्षाचा जनाधार’ असेही म्हटले जाते. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले आहे.पक्ष कार्यक्रम : विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तरी कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात.सरकार स्थापन करणे : राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार करतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्यापक्षाचे असते. ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. शासन व जनता यांच्यातील दुवा : राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात, तर शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण-कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करते.

भारतातील पक्षपद्धतीचे बदलते स्वरूप (१) स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्यपातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन ‘एक प्रबळ पक्ष पद्धती’ असे केले जाते. (२) एक प्रबळ पक्ष पद्धतीला १९७७ मध्येआव्हान दिले गेले. हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिले. (३) १९८९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा
ठरवला. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या
राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे.

राष्ट्रीय पक्ष(संदर्भ : Election Commission of India, Notification No. 56/201/PPS-111, dated 13 December 2016)(१) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्यावेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्नकरणारी चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्रआले होते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक सर्वांत प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी ‘समान हक्क, व्यापक समाजकल्याण’ हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यांवर या पक्षाचा विश्वास आहे.(२) भारतीय कम्युनिस्ट पक्ष : मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्याया पक्षाची स्थापना १९२५ साली झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्ग व कामगारांच्याहितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे.१९६० च्या दशकात चीन व सोव्हिएट युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्वस्वीकारायचे, यावरून या पक्षातील नेत्यांमध्येवैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीयकम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीयकम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) हा पक्ष १९६४ साली स्थापन झाला.

(३) भारतीय जनता पक्ष : भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष १९५१ मध्ये स्थापन झाला. १९७७ मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीयजनसंघ विलीन झाला, परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने १९८० मध्ये नवा पक्ष स्थापन केला. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे. (४) भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) : समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्याहितसंबंधांची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे.(५) बहुजन समाज पक्ष : बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित हे या पक्षाचे उद्दिष्ट असून १९८४ साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्य यांचा समावेश ‘बहुजन’ या शब्दात होतो. बहुजन समाजाला सत्तामिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे.(६) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १९९९ मध्येझाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष १९९९ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्येही २००४ ते २०१४ इतक्या प्रदीर्घकाळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक घटकपक्ष होता.(७) तृणमूल काँग्रेस :ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना १९९८ मध्ये झाली. २०१६ मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे.

One thought on “Class 10th|Political parties

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!